पावसाच्या मनात काय असत ?
ते कोणालाही माहीत नसतं...
पण मला कळत सार काही...
तो कधी कुठे पडेल... अन् कुठे नाही...!
आज अनेक दिवसांनी......... पाऊस पुन्हा आलाय...
त्याला पाहून मला सोडून इतर सगळ्य़ांनाच आनंद झालाय !!
सगळे खुष...त्यांना वाटातयं...तो परत आलाय...जाणार नाही!
सगळेच चुकले ...... तो केवळ तुझा निरोप घेऊन आलाय !!
तो काही फार वेळ रहाणार नाही...
तो अन् मी दोघेही आज रड रड रडलो...!
पण कोणाला काही कळलच नाही !
आपल्या मिलनाला त्याची,अन्...
त्याला आपल्या दोघांची इतकी सवय झालीयं....
की तो ही भावनांत गुरफटलेला ....!
कधी तुझ्या दारी,....
कधी माझ्या उरी.....
दिवस रात्र बरसलेला !!
इतके स्वार्थी प्रेम माझे...
आपल्या मिलनाला सदैव खुलवणारा तो...
मला उगाच वाटे...तो आपल्यात टपकलेला !!
खरं काय ते तो आज बोलला.....
.....
.....
खरे काय ते.... आता कळले....
गतजन्मीचा शापित प्रेमकवीच तो......विरहकाळी झुरलेला !
ह्या जन्मीचा....मेघदुत तो....
युगलमिलनी सदा हर्षित तो...अन् विरहातही न सरलेला !
निरोप तुझा तो घेऊन आला...
म्हणे,
"मित्रा....मलाच थोडा विलंब झाला....
प्राणाहुन हि तु प्रिय तिला...
प्रेमी आधि अन् मग कवी तु....
का उगाच........ काव्य विनोद केला ?
प्रियेचा रुसवा........ कमी का होता..?
त्यात तुझ्या.... मुद्रारक्षसाने कोप केला !!
माझा अनुभव न येवो तुला.....,
गतजन्मीचा प्रेम कवी मी....
कालबंधनात अडकलेला.!
तिच्या विरहात ह्या जन्मी ही....
रानो-पानी विजेप्रमाणे तडकलेला !!"
ऐकुन त्याची आर्त कहाणी...
हा शीघ्रकवी ही शब्दबंधनात अडकलेला !
तुझ्या प्रतिसादा अभावी....
आकाशातल्या विजेप्रमाणे......मनामध्ये तडकलेला !
हे जीवन सुंदर आहे...
त्याची सुंदरता डोळ्यांनी पाहून,
मनात समजून कळत नाही...त्याला संवाद साधावा लागतो...!!
०३ सप्टेंबर २००८ १२:०३ रात्रो
No comments:
Post a Comment